
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
नगर दर्शन (वृत्तसेवा):- राज्यभर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून



























